कोणत्याही संस्थेची उभारणी करायची असेल, तर अर्थव्यवस्थापन ही महत्त्वाची गोष्ट असते. शिवाजी महाराजांनी, तर स्वराज्याची उभारणी केली. त्यासाठी त्यांनी आर्थिक व्यवस्थापन कसे केले असेल, हा कुतूहलाचा विषय आहे. प्रा. नामदेवराव जाधव यांनी या पुस्तकात महाराजांच्या अर्थशास्त्रावर प्रकाश टाकला आहे. ‘केवळ तीन लाख ६० हजार रुपयांतून सुरू केलेलं स्वराज्य महाराजांच्या वयाच्या ५० व्या वर्षी तीन लाख बेचाळीस हजार कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न घेणारं आर्थिकरित्या सक्षम राष्ट्र म्हणून उदयाला आलं,’ असे ते सांगतात.
महाराजांनी मावळ्यांना काटकसर करायला शिकवले होते. महाराजांनी पायाभूत सुविधांची निर्मिती कशी केली याबरोबरच विनातारण कर्ज, शिवकालीन चलन, संरक्षण, विदेश व्यापार दक्षता आदी विषयांची माहिती दिली आहे. उत्पन्नाची साधने, प्रशासकीय खर्च, कायम शिल्लक यांचा ताळेबंद बांधला आहे.
प्रकाशक : राजमाता प्रकाशन
पाने : २१६
किंमत : २५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)